Tuesday, August 08, 2006

ashwinis-creations

ashwinis-creations
खूप दिवसांपासून मला ही कविता आठवत होती, दुसरीत असतांना पाठ केलेली.....
"पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ"
कुणाला ही पूर्ण येत असेल तर प्लीज मला कळवा..........
या कवितेशी माझ्या लहानपणीच्या खूप आठवणि निगडित आहेत.
...
पावसाळी दिवसात त्या अधिक कातर होतात, मन मागे खेचल्या जातं...आजच्या सगळ्या सुखसोयी वृथा वाटू लागतात, आणि जुनेच ते अडी अडचणींचे, पड्त्या पावसातल्या मंद पिवळ्या बल्बचे, श्रावण सोमवारी केलेल्या केळ्याच्या शिकरणीचे, कुठलंही मोठं दडपण नसलेले ,अतिशय क्षुल्लक सुखांचे दिवस आठवून मन भरून येतं........
किंबहुना ज्या वेळी जे असतं ते न आवडणं हाही मानवी मनाला मिळालेला एक शापच म्हणायला हवा!

No comments: