नको अशा सांजवेळी कुठे रस्त्यात दिसू !
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Wednesday, May 05, 2021
Thursday, December 17, 2020
कन्हैया! क्या सचमुच नंदगांव से चले जाओगे ?”
“कन्हैया! क्या सचमुच नंदगांव से चले जाओगे?”
आँखों में यमुना की धार लिए खड़ी विमला ने जैसे अंतिम प्रयास किया।
“नंदगांव से जाने के लिए ही तो रथ द्वार पर है विमला! पर तुम्हारे हृदय से कभी नहीं जाऊंगा, यह टेक रही।”
“अरे छोडो भी, तुम्हारा तो जन्म ही दुनिया को भरमाने के लिए हुआ है शायद। हमनें तो सोचा था कि तुम्हारे बियाह में नाचने के बदले मरने पर तुम्हारे हाथ की लकड़ियाँ मिल जाएंगी, तुम तो अभी छोड़ कर जा रहे हो।”
कृष्ण मुस्कुराये, “हट झूठी! हमनें तो सौ बार कहा कि राधा से मेरा बियाह करा दे, पर तूने एक बार नहीं सुनी। नाचने की साध पूरी न हो गयी होती। तुझे तो साध ही न थी।” ” इतना छलना कहाँ से सीखा रे छलिये? नंदगांव के ग्वालों में तो छल का लेश भी न था। अरे हाँ, तू तो राजा का बेटा है न, फिर क्यों न छले। राजाओं का तो काम ही है छल करना। पर तू क्या सोचता है, तुम्हारी इन झूठी बातों से हमारी पीर थम जायेगी?”
कृष्ण ने अनुभव किया, जैसे छाती के भीतर कहीं से उठी एक टीस ऊपर आ कर गले को बांध रही है, और आँखे भींगने ही वाली हैं। उन्होंने बात बदली, “अच्छा छोड़ विमला; यह बता, मैं जा रहा हूँ तो मुझे कुछ उपहार न देगी?” विमला ने कुछ देर अपलक निहारा उस सांवले को, जैसे उसे आँखों की पुतलियों पर छाप लेना चाहती हो। फिर बोली, “दरिद्रों का सबसे बड़ा धन क्या होता है, जानते हो कान्हा?”
कृष्ण बोले- नहीं रे गुरुआनी, तू ही बता दे।
विमला बोली, “हाँ तू क्यों जाने, तू तो राजा ठहरा। पर जान ले, दरिद्रों का सबसे बड़ा धन उनके आँख की लोर होती है। वही उनका मूल होता है और वही लाभ। राजा कितनी भी सम्पत्ति क्यों न बना ले, उसके पास यह धन नहीं होता। कह तो उपहार में वही दे दूँ? पर तू मेरे अश्रुओं का करेगा क्या?” कृष्ण के पास कोई उत्तर नहीं था। उन्होंने फिर बात बदली, “अच्छा जा झूठी ग्वालन, कुछ देना तो है नहीं, झूठ मुठ का बात बनायेगी। हट मुझे राधा के पास जाना है।” “आहाहा! बड़ा आया राधा के पास जाने वाला! अच्छा एक बात बताओ मोहन! हमारी तो जाने दो, पर क्या तुम्हे राधा पर भी मोह नहीं आता? क्या उसके अश्रुओं का भी तुम्हारी दृष्टि में कोई मोल नहीं?” कृष्ण पहली बार गंभीर हुए, “राधा की आँखों से यदि अश्रु की एक बूंद भी गिरे तो समझना कि कृष्ण को प्रेम करना ही नहीं आया। प्रेम पाने की लालसा का नाम नहीं, प्रेम त्याग कर सकने की शक्ति का नाम है। अच्छा तो मैं जा रहा हूँ। याद रखूँगा कि जाते समय विमला ने मुझे कोई उपहार नहीं दिया।”
विमला ने मुह में आँचल का पूरा कोना ठूस कर मन ही मन कहा, “तुम क्या जानो कि विमला का क्या ले कर जा रहे हो कन्हैया, जाओ खुश रहो।”
कृष्ण का रथ तैयार था, पर वे भागे भागे पहुँचे बूढ़े पीपल की छांव में, जिसकी जड़ों पर चुपचाप निढाल पड़ी राधिका का मुह कृष्ण के उत्तरीय की तरह पीला हो गया था, जैसे उसने अपने मुख पर ही कृष्ण को ओढ़ लिया हो। कृष्ण ने मुस्कुराते हुए कहा, “जा रहा हूँ राधे, विदा न करोगी?”
राधा देर तक निःशब्द पड़ी रही, फिर सर झुका कर ही कहा, ” फिर आओगे न?”
कृष्ण गंभीर हुए, “कौन जाने राधा! नियति बड़ी क्रूर होती है और कर्तव्य बड़ा ही कठोर।”
राधा ने सर झुका कर ही कहा, “एक बात पूछूं कृष्ण, जब जाना ही था तो आये क्यों थे?”
कृष्ण के मुख पर उदासी पसर गयी थी। बोले, “जानती हो राधा, यदि नहीं गया तो आने वाले युगों युगों तक संसार तुम पर ही लांछन लगाएगा।”
राधा ने कोई उत्तर नहीं दिया। वह शायद उत्तर देने का क्षण ही नहीं था, समूचे बृंदाबन का तृण-तृण जैसे मौन पड़ा था। राधा ने फिर पूछा, “अच्छा कृष्ण, तुम्हे हमारी याद तो आएगी न?”
कृष्ण कांप गये। बोले, ” अब क्या रो दूँ तब मानोगी राधिका? स्मरण रहे, इस जगत में सिर्फ हमीं दोनों हैं जिन्हें रोने का अधिकार नहीं। तुम्हें मैं क्या याद रखूँगा, हमें युग याद रखेंगे।”
राधा ने शीश झुका कर ही कहा, “तुम्हें तो सब देवता कहते हैं न कृष्ण, एक बात मानोगे?”
कृष्ण ने उच्छ्वास की तरह शब्द उगला, “कहो राधिके।”
राधा ने कहा, “इस जगत को आशीर्वाद देना कि फिर यहां कोई राधिका न जन्मे।”
कृष्ण बिना उत्तर दिए ही मुड़ गये।
कौन जाने उन्होंने राधिका की बात मानी भी या नहीं।
Saturday, September 19, 2020
भाग्यरेखा....
:
कोणाच्या भाग्यरेखा कोणाला कुठे घेऊन जातील.. काही सांगता येत नाही!
निसर्गात बरोबर-चूक असे काही नसते. फक्त “असते”!.. त्याला बरोबर-चूक हा चांदी-वर्ख आपण चढवतो.
आता पहाना, नदीने समुद्रात गेलेच पाहिजे. त्यात तिची परिपूर्ती. तसं नाही झालं तर चक्रच थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली की खळकन....
पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.. Okavango नदी...Angola, Namibia आणि Botswana तून वाहणारी.. संपन्न ...१५०० किमी पेक्षा लांब..आणि ती बोत्स्वानात पोचल्यावर नुसतीच धावधाव करून पसरते.. पूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होते, मग ते आटले पण तरी ही तिच्या जुन्या डगरीने तिथेच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होते...
जगभर अशा खूप नद्या आहेत , ज्यांचा डेल्टा नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी "धराशायी" होते... किती सुंदर शब्द आहे, धराशायी...पृथ्वीवर निजणारी..
आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर..हिची बहिण बनी..ती सहारा वाळवंटाकडे अगदी आपली वाट वाकडी करून जाते... आणि बनवते "मसिना"!.. वाळवंटाजवळ एक हिरवा, पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश! बनी नाही मिळत समुद्राला !
आपल्याकडे तर रेलचेल आहे . कच्छ चे रण .. इथे पूर्वी अरबी समुद्रच होता...खूप पावसाळ्यात आजदेखील सगळं वाळवंट पाण्याने भरून जातं.
इथे एक नदी येते लगबगीने, पण मग तिची गोची होते... समुद्र कुठेय? शोधताना तिचे पाणी अनेक दिशांनी धावते आणि पसरते इथेच.. ही लुणी नदी..कच्छच्या रणात विरघळणारी..
तशीच रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपल वेगळी कथा. प्रत्येक जण झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं....
असो. सांगायचं काय होत ते विसरलेच.... खरं तर सांगायचं फारसं काही नसतं, एक-दोन तारा जोडायच्या असतात कधी, कधी चुकार प्रतिबिंब बघायचं असतं, चाफ्याचं एखादं फुल उचलून केसात खोचायचं असतं, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन-absurd गोष्ट सांगायची-ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच बहुतेक... पुढे खूप दिवस पुरतं हे..पण कशाला हे सगळं?......
धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. ही जाण महत्वाची! कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट.. ठीक आहे ... वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी आपलं कर्तव्य विसरत नाही....परत बरसतेच.
प्रत्येकाच्या मनात अशी एखादी नदी असते..... . शांत रात्री तिची साद ऐकू येते का बघा..
तिला खळबळू देणं, आवर घालणं, उन्मुक्त बेभान वाहू देणं अथवा शांत मधाच्या धारेसारखं नीरवतेने ओतत राहणं...सगळं आपल्याच तर हाती असतं............
आधी छोटा अल्लड प्रवाह, मग लहान षोडषा नदी, मग उपनद्या येउन मिळत गेल्याने विस्तारलेली पोक्त नदी..आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळणे....... स्त्रीचं आयुष्य असो वा नदीचं....सगळ्यांचा प्रवास एका ठरलेल्या आखलेल्या मार्गावरुनच व्हावा असा काही नियम तर नाहीये ना?
Thursday, September 17, 2020
कोरोना... कोरोना...ओ कोरोना
कोरोना..
सगळ्या जगाला व्यापून वर दशान्गुळे उरणारा प्रलयंकारी राक्शस!
आई...ए आई... पार्थच्या हाका मारण्याने ईशा भानावर आली. "काय रे...?"
"अगं..आज संध्याकाळी सात वाजता टाळ्या अन थाळ्या वाजवायच्या आहेत ना..... मोदीजीन्नी सांगितलंय......."
"कोरोना पळून जाणारे म्हणे त्याने.........." पार्थ उत्साहाने सांगत होता...
ईशाच्या डोळ्या समोरुन व्हॊट्सप चे मेसेजेस तरळून गेले....
मोदीजी यांचा मास्टरस्ट्रोक...., टाळ्या व थाळ्य़ा यांच्या एकत्र नादाने एक रेझोनेटिंग फ़्रिक्वेन्सी तयार होणारे..ज्याने वातावरणातील जंतू नष्ट होतील......
या दिवशी या वेळी अमुक तमुक ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत........त्याने फक्त भारतावरच परिणाम होणारे व आपल्याकडील विषाणू पूर्णपणे निष्प्रभ होणार..........
ती मना्शीच हसली...पार्थच्या कु्रळ्या,मऊ केसांतून हात फिरवीत त्याला म्हणाली.."अरे...एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून ठीके पार्थू..फारतर जरा टीम बिल्डींग, स्फूर्तीदायी कृती म्हणू शकतो आपण तिला......या पलिकडे काही नाही.......वाजवू आपण टाळ्या थाळ्या..पण खरी जबाबदारी म्हणजे काळजी घेणे हीच आहे.......हात सतत धुणे, मास्क्स वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे...हो किनई...?"
"हो...अर्थातच.....आई.."पार्थ वर्गात पहिला येणारा मुलगा होता..
Tuesday, November 12, 2019
फकीर
दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही
आयुष्याचे गूढ चित्र अन
सावल्यांतुनी रेखीत जाई।।
भकास माळावरती एका
जीर्ण एकले मंदिर पाही
कोनाड्यातील पागोळीगत
उरात फडफड, काहूर काही।।
कळसावरचा अंध पिंगळा
दु:ख मुक्याने साहत राही
कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही।।
माथ्यावरती सूर्य तळपतो
तप्त दाह अन लाही लाही
खुळ्या स्मृतींचा मंद गारवा
परि जिवाला शमवत राही।।
दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही….
-
वाटा अनवट चालत राही
आयुष्याचे गूढ चित्र अन
सावल्यांतुनी रेखीत जाई।।
भकास माळावरती एका
जीर्ण एकले मंदिर पाही
कोनाड्यातील पागोळीगत
उरात फडफड, काहूर काही।।
कळसावरचा अंध पिंगळा
दु:ख मुक्याने साहत राही
कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही।।
माथ्यावरती सूर्य तळपतो
तप्त दाह अन लाही लाही
खुळ्या स्मृतींचा मंद गारवा
परि जिवाला शमवत राही।।
दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही….
-
Friday, August 30, 2019
ये दिल और उनकी..............
ये दिल और उनकी निगाहोंके साये.....
पर्वत, पक्षी, नद्या, झाडं, धुके.. सगळा निसर्गच प्रेमाशी संलग्न आहे. प्रेम ही सगळ्यात हवीहवीशी उत्कट भावना! आपण प्रेमाचे पडसाद भवतालच्या रम्य निसर्गात शोधत राहतो.
निसर्गा च्या सहवासात भावना अधिक उत्कट पणे व्यक्त होतात आणि आतला आवाज ऐकू येतो. मन आणि भान हरपून जाणारा निसर्गाचा विलोभनीय सहवास!
सगळ्या गाण्या-कवितांत खळखळत्या नद्या, हिरवीगार शेतं , नाजूक फुलं, पहाड- पर्वत यांची वर्णनं आढळतात.... .... प्रेम, कल्पना, सौंदर्य यांना व्यक्त करणारी. प्रेमाची प्रतीकंच जणू!
प्रेमात असलेला माणूस तर सगळ्याच गोष्टींचा संबंध प्रेमाशी अथवा प्रेमिके शी जोडतो. तो प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतो की आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी तिच्याशी जोडतो. प्रत्येक ठिकाणी तीच दिसते.
हा सुंदर निसर्ग आहे, तू मन व्यापून राहिलेली आहेस, मनभर आनंद ओसंडतो आहे......! जगायला खरंच अजून काय हवं?
कुठेतरी रमणीय पहाडीवर, हिरव्या वनराईत, झुळझुळत्या नदीच्या किनारी तुम्ही त्याच्या विचारात रममाण झाला आहात. तो सोबत असताना किंवा नसताना..........सदैव ऐकावसं वाटणारं हे गीत....लताचा स्वर्गीय आवाज ...!
तिचा आवाज आणि हा आजूबाजूचा बहारदार, हिरवागार आसमंत......जयदेव च्या संगीतावर तिचे मधुर बोल...
हं ह्म...ह्म ह्म.. हं
संतूर आणि बासरीची साथ. थोडासा मटका ताल आणि ढोलक ही. मधुर असं स्वरमंडल आपल्याला प्रेमाच्या धुंदीत नेतं.
ये दिल और उनकी निगाहोंके साये
मुझे घेर लेते वो बाहोंके साये
माझे मुठी एव्हढे हृदय काय ते उरले आहे...ते ही माझ्या ताब्यात नाही. .तर त्याच्या एकटक नजरेच्या छायेत.
न बोलता तो मला आपल्या बाहुपाशांत हलकेच लपेटून घेतो. ...
जिथे पर्वत दर्यांना भेटतात त्या वळणावर, जिथे धुक्याने वेढलेली हिरवाई आहे, प्रेमाच्या आवेगाने अंगावर अधिकचा शहारा आणणारी थंड झुळूक मन सुखावते आहे अशा निसर्गाच्या कुशीत संगीत तुम्हाला अलगद घेऊन जातं!
प्रेम पर्बत मधलं हे अप्रतिम गीत!
जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं. स्त्री प्रधान गीतांना संगीत देतांना जयदेव यांची प्रतिभा नेहमीच अगदी तरल, धारदार व प्रसन्न असायची आणि सुरावटी तरी किती श्रीमन्त !
गाण्याच्या सुरुवातीलाच पहाडांच्या प्रतिध्वनीचा प्रसन्न पणा आहे. पाण्याचा खळखळाट, लख्ख सूर्यप्रकाश यांनी मिळणारा निरागस आनंद यांची प्रचीती देणारा.
एकमेकांत बेमालूम पणे मिसळून गेलेल्या संतूर आणि बासरीचा अप्रतिम वापर. राग पहाडीवर आधारीत असलेलं गाणं.
पहाडोंको चंचल किरन चूमती है
हवा हर नदी का बदन चूमती है
यहा से वहा तक है चाहोंके साये
सूर्याची कोवळी किरणे पर्वत माथ्याला स्पर्श करताहेत; हवेची झुळूक नदीवरुन लहरत जाते.
मला सगळीकडे, अवती भवती आपले प्रेमच दिसते आहे. प्रेमाच्या आश्वासक छाया सर्वत्र भरुन राहिलेल्या आहेत.
लिपटते ये पेडॊंसे बादल घनेरे
ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे
बहोत ठंडे ठंडे है राहोंके साये
घनदाट ढग झाडांना वेढून आहेत. ऊन सावल्यांचा लपाछपीचा खेळ चालू आहे. माझ्या पुढल्या वाटेवरचा प्रवास किती आनंददायी असेल याची ही जणू नांदीच आहे.
धडकते है दिल कितनी आजादीयोंसे
बहोत मिलते जुलते है इन वादीयोंसे
मुहब्बत की रंगीन पनाहोंके साये
या मोकळ्या, दिलखुलास दर्यांसारखीच आपली हृदयं पण धडधडत आहेत. निसर्गाच्या विलोभनीय दुनियेत प्रीतीने आसरा घेतला आहे. मुक्त , आनंदमयी आणि सर्वस्व असणारी तुझी माझी आश्वासक प्रीत सगळीकडे भरुन राहिली आहे.
जयदेव यांच्या उत्कट स्वरसाजाने जां निसार अख्तर यांचे काव्य खुलले आहे. कवितेचा मूळ गाभा अशा मेलोडियस संगीताने अधिकच झळाळून उठतो. यात प्रेमिकेने प्रियकराबरोबर व्यतीत केलेले प्रेमाचे क्षण आहेत. ती त्या प्रेमात इतकी हरवून गेली आहे की आजूबाजूच्या निसर्गात ती त्याचीच प्रतिबिंबे शोधते. त्याच्या सोबत घालविलेल्या क्षणांची उत्कटता, असोशी आठवत राहते. अविचल, मनभर आनंदाचा खजिना आणि अनुरागाच्या पडछाया........
लताचा अतिशय गोड स्वर, मधुर संगीत आणि उसळत्या, खळाळत्या निसर्गाचे वर्णन करणारे अप्रतिम शब्द.....
एक प्रेमगीत साकार होतं....
ये दिल और उनकी निगाहोंके साये........................
Thursday, August 08, 2019
कधी कधी मज असे वाटते......
माझ्यामधल्या ’मी’ ला काढून
निरखाव्या लोकांच्या नजरा
निर्लेप पणाने जाणून घ्यावा
खोट्या शब्दांचा अर्थ गहिरा
कोण कसे, कुणाचे काय
अनुभवाच्या उदंड राशी
प्रचीती येता नक्की पटेल
प्रत्येकाचीच खूण जराशी
मुक्त होऊनी माझातली मी
पडेल बाहेर अन उडेल जरा
तेव्हाच कळेल असतो कसा
उधाणलेला पाऊस, सोसाट्याचा वारा
आत आत लपून चालेल कसे
अंधार तळात कुठले कवडसे?
तोड साखळी , उघड दार
घे झेप आणि क्षितीजापार
निरखाव्या लोकांच्या नजरा
निर्लेप पणाने जाणून घ्यावा
खोट्या शब्दांचा अर्थ गहिरा
कोण कसे, कुणाचे काय
अनुभवाच्या उदंड राशी
प्रचीती येता नक्की पटेल
प्रत्येकाचीच खूण जराशी
मुक्त होऊनी माझातली मी
पडेल बाहेर अन उडेल जरा
तेव्हाच कळेल असतो कसा
उधाणलेला पाऊस, सोसाट्याचा वारा
आत आत लपून चालेल कसे
अंधार तळात कुठले कवडसे?
तोड साखळी , उघड दार
घे झेप आणि क्षितीजापार
Subscribe to:
Posts (Atom)


